Thursday, October 02, 2008

नसतेस घरी तू जेव्हा

नसतेस घ्ररी तू जेव्हा जीव तूटका तूटका होतो
जीवनाचे विरती घागे,संसार फाटका होतो

सलीलचे हे शब्द स्वर काळजाला एकदम भिडतात.
आपली प्रिया आपल्या जवळ नाही तेव्हा कस वाटत हे शब्दात सांगण तस अवघडच!
पण संदिप-सलील ने हि भावना शब्दात स्वरात ज्या प्रकारे व्यक्त केली आहे त्याला तोड नाही.
ती जवळ असते तेव्हा घराला एक वेगळ व्यक्तिमत्व असत. घरातल्या प्रत्येक वस्तूला तिच्या असण्याच भान असत. आँफिस मधून घरी आल्यावर एकत्र चहा पिताना चहाला पण वेगळाच स्वाद असतो.
दिवसभर झालेली वणवण घरात येता क्षणी संपलेली असते.

सकाळीआँफिसची वेळ साधताना होणारी लगबग,घाई गर्दी पळापळ घरातील वातावरण चैतन्यमयी करुन टाकते. सुट्टीच्या दिवशी दोघांनी मिळून पार पाडलेली आठवद्याची कामे,चहा पीता पीता निंवांतपणे वाचलेला पेपर किंवा मग फालतू कारणा वरून झालेले वादविवाद,भांडणे,रुसवे फूगवे!
ह्या सगळ्यातील मजा काय आहे ते कळण्यासाठी तीच नसण मह्त्वाच असत! ती असताना तीच असण कस जाणवणार कारण आपण ते प्रत्यक्ष अनुभवत असतो. ते असताना दिवस कधी उगवतो व कधी संपतो ते कळतच नाही.दिवसभर तीच अस्तित्व आपल्या भोवती भोवती घुटमळत असत. अगदी पायात पायात येणारया मांजरी सारख! दिवस्भर ती प्रत्यक्ष आपल्या बरोबर नसली तरी संध्याकाळी ती भेटणारच असते त्यामुळे तेव्हा देखील तीच अस्तित्व आपल्या भोवतीच असत.
हे अस तीच असण इतक सवयीच होत कि ते मग गृहितच धरल जात. श्वासा सारख होत. सतत जवळ असणार, त्याच्याशिवाय जगू न शकणार!

मग जेव्हा ती खरोखर लांब जाते तेव्हा मग तिच्या असण्याच महत्व जाणवत.

"नभ भांडून वीज पडावी,कल्लोळ तसा ऒढवतो
ही धरा दिशाहीन होते,अन चंद्र पोरका होतो

हे अचानक कोसळलेल संकट आपल्याला दिशाहीन करून टाकत अगदी पोरक करून टाकत.घरातल्या सगळ्या वस्तूवर सजीव व निर्जीव ,मरगळ पसरुन रहाते.सकाळच कोवळ उन खर तर नेहमी उत्साहीत करत पण आज तस नसत.

"येतात उन्हे दाराशी,हिरमूसून जाती मागे
खिडकीशी थबकून वारा,तव गंधावाचून जातो.

आता तिच अस्तितवच जवळपास नसल्यामूळे फक्त त्या अस्तितवाच्या आठवणीच असतात.श्वासच थांबल्या सारख होत.

" तव मिठीत विरघळणारया,मज स्मरती लाघव वेळा
श्वासाविन -हदय अडावे,मी तसाच अगतिक होतो

तिच नसण फक्त मलाच नाही तर आख्या घराला जाणवत असत. सगळ घरच उदासवाण झालेल असत.
देवासमोरची समई जी नेहमी आनंददायी शांततेत असते ती देखील उदासवाणी शांत असते.

"तू सांग सखे मज काय, मी सांगू या घरदारा
समईचा जीव उदास,माझ्यासह मिणमिण तूटतो."

तिच अस अस्तित्व जाणवण्यासाठी वयाची अट नाही. ते कधीही जाणवत. तरल तारुण्यात,सजग प्रौढत्वात किंवा मग मुरलेल्या वार्धक्यात!

"ना अजून झालो मोठा,ना स्वतंत्र अजूनी झालो
तूज वाचून उमगत जावे,तूज वाचून जन्मच अडतो"

वयाची अट नाही पण हे जाणवण्यासाठी एक अट मात्र आहे
तिच्यावर उत्कटतेने प्रेम करण्याची.

4 comments:

Saee said...

hey baba..
really nice post. I guess you are missing aai a lot! ;)
Cheer up!!
Saee

शिरीष said...

Thanks Sai
This song is too good!In fact all the songs (basically avita)take you in adifferent world.Yes I miss her but even if she was here I would have written on this song as I had decided to write much earlier but I DID not!

HAREKRISHNAJI said...

करीब रहकर भी उन्हे अपना बना न सके
हम अपने दाग दुनीया को दिखा न सके.

मै शकील उनका होकर भी ना पा सका हू उनको
मेरी तरहा दुनीया मे कोई जीत कर भी न हारे

आपण दाह खुप मखमली मांडला आहे

शिरीष said...

हरकिशनजी आपके अभिप्राय के लिए धन्यवाद!
आपने जो नज्म लिखी है वो भी बेहतरीन है.