Saturday, December 15, 2007

दिवाळखोरी शब्दांची!

सप्तशब्दातील सप्तरंगी इंद्रधन्यूष्य,
पंचशब्दातील पंचमहाभूतं
बघतात आता त्या अभागी कवीला
कवितांची दिवाळखोरी जाहीर करताना

शब्दांची दिवाळखोरी जाहीर करताना,
आपल्या वाचकांची माफी मागताना
त्याचे ते अनेक लाडके शब्द
अचानक कूठे गायब झाले?

आता अंतःकरणातील वेदना
मंद झाल्या आहेत
अधीर मनातील शब्द्स्त्रोत
मूर्छीत झाले आहेत

आता आहेत फ़क्त वेदनामय रात्री
व निद्रीस्त दिवस
सतत साथ करणारे लाडके शब्द
आता गेले आहेत दूर निघून

पूर्वी शब्दामधे जागा असायच्या
आता जागांच्यामधे कधीतरी शब्द
त्याच्या कवितांना आता
सामोरं जाव लागत
एका अनाहत शांततेला

(सई केसकर यांच्या Bankrupt Poet या कवितेचा स्वैर अनूवाद. Orignal poem :Link-http://saeekeskar.blogspot.com/)

Tuesday, December 04, 2007

स्वांतंत्र्याच बंधन

लोकहो प्रत्येक गोष्टीची कींमत ही मोजावीच लागते,
अगदी स्वांतंत्र्याची देखील! कींमत देउनच घ्याव लागत ते!
किंमंत दिल्यावर ते नुसत मिळ्तच नाही तर चिकटून बसत आपल्याला
आपल्याशी भुणभूण करत.
कधी कधी भर वाऱ्यात बाईक वरून सुसाट जाताना,
आदळत आपल्याच अंगावर वाऱ्याचा झोत होऊन
कधी उमटत पाहूण्यांसाठी अंथरलेल्या ठेवणीतल्या गालीचावर
छोट्या पिल्लाच्या चि्खललेल्या पाउल खूणातून
कधी अचानक दिसत ते,अस्वथ खळाळणाऱ्या लाटा
समर्थपणे झेलणाऱ्या खंबीर पूलावर
रात्रीची रेशीम दूलई गुंडाळू्न स्वच्छ सूर्यप्रकाशातून जाताना
ते अवचित येत आपल्यासमोर
पावसाच्या टपोऱ्या थेंबात किंवा हिमकणांच्या वर्षावात
पण ते मी गर्वाने मिरवते
त्या मुळेच मी मागे फिरत नाही कुठ्ल्याही काटेरी वाटेवरून,
ते मला बांधून ठेवतं अशा अवघड वाटेवर.
माझ्या एकटेपणाचा आनंद व स्वतंत्रपणाची भावना,
क्षणातच संपते,कारण माझ्याबरोबर माझ स्वातंत्र्य
असतच ना एखाद्या लोढण्यासारख!

(मुळ कविता Freedom? सई केसकर Link-http://saeekeskar.blogspot.com/)

Monday, November 12, 2007

जीवना्ची लय

छोट्या छोट्या आठवणी इवल्याश्या पायांच्या,
निरागस हळूवार
नुकत्याच पडलेल्या दवबिंदूंच्या,
जे वाहून जाण्यास ठाम नाकारतात,
व लहानग्याच्या हट्टासारखे पानाफूलावर बसून रहातात.

किंवा मग ऎटदार,फूगीर,कट्यावरच्या मनिमाऊच्या
जी तृणदवांनी भिजलेले आपले गुलाबी तळ्वे,
झूपकेदार मिशातून अलगद बाहेर आलेल्या इवल्याश्या जिभेने चाटता चाटता बघत असते
तुमच्या डोळ्यातील अनावर कूतूहल
तिच्या गर्द हिरव्या पाचूदार डोळ्यांनी.

किंवा मग बागेत नकळत फुलणाऱ्या फूलांनी,
नकळत वेधलेले तूमचे लक्ष
आणि मग फुलावरील दवबिंदू आपल्या ओंजळीत घेण्याची उत्स्फूर्तता दाटून आलेली.

कधी कधी कूणीतरी हळूच आपल्या नकळत
आपल्यासाठी ठेवलेल्या चाँकलेट्सची.
तर कधी मेल मधून पाठवलेल्या आपल्या आवडत्या गाण्याची ज्यामुळे मग हात नकळत वळतात तीच धून प्रामाणिकपणे वाजवण्यासाठी आपल्या गिटारकडे.

त्तर कधी मैत्रीचे क्षण साठवणाऱ्या एकांती शांततेचे

जीवनाच्या या गाण्यातील लयबध्दता राखतात
याच छोट्या छोट्या आठवणी.
(सई च्या हारमनी या कवितेच मुक्त भाषांतर . मुळ कवितेची लिंक http://saeekeskar.blogspot.com/)

Saturday, October 06, 2007

शब्दे विण संवादू

"मनाचिया गुंती गुंफीयला शेला" अशा ओळी ज्ञानदेवांच्या मोगरा फुललाच्या शेवटी येतात.
मनाचा गुंता किती गुंतागूंतीचा असतो ना? अशा गूंत्यातून शब्दांचे शेले विणण खर तर खूपच अवघड काम आहे.
लेखक कवी,विचारवंत,ज्ञानी लोकांनी हे काम उत्तम प्रकारे केले आहे.तरी देखील मला अस नेहमी वाटत की खरोखर मनाचा गुंता पूर्णपणे व्यक्त करण्याची क्षमता शब्दात नसते.मनाचा गुंता अफाट,मनस्वि ,अगम्य असतो.बऱ्याच वेळा शब्दांना हार मानावी लागते,लाचारी पत्करावी लागते. आणि जे शब्दात व्यक्त झाल अस आपल्याला वाटत ते तरी किती व्यक्त झालेल असत?
प्रेम,माया,ममता,मैत्री ह्या सु्खद भावना तसेच द्वेष,मत्सर,असुया,शत्रूत्व अशा विकारी भावना जशा आपण अनुभवतो तशाच्या तशा शब्दात कूठ मांडू शकतो? कळत नकळतच्या वयातला त्याच्या व तिच्या नजरा मधून चालणारा संवाद येइल शब्दात मांडता? एखाद्या उदा्सवाण्या संध्याकाळी एकटेच असताना शिवरंजनीचे आर्त पिळ्वटून टाकणारे सूर ऎकल्यावर मनाची जी अवस्था होते ती तशीच्या तशी येइल का मांडता शब्दात?

म्हणू्नच काही वेळा ग्रेस,आरती प्रभू,पु.शि.रेगे सारख्या कवींच्या रचना कळल्या सारख्या व न कळल्यासारख्या देखील वाटतात, अँब्स्ट्रँक्ट फाँर्म मधली चित्र मनाला काही वेळा भावतात पण नक्की काय आहेत हे समजत नाहीत. शा्स्त्रीय संगीतातील काही सुध्दा कळत नसताना एखादी तान,सुरावट मनाला हूरहूर लावून जाते.
जीएंच रमलखूणा,पावलो कोहेलोच अलकेमीस्ट, खानोलकराच कोंडूरा वाचल्या वर अनेक प्रश्नांच मनात काहूर उठत. आपल्या मनातील भावनांच्या आवेगाला वाट करुन दिल्याशिवाय मनुष्य प्राण्याला चैन पडत नाही.कदाचीत माणसाच्या याच प्रयत्नातून विविध कलांचा जन्म झाला असावा, लेखक,कवी आपल्या भावना शब्दातून मांडण्याचा प्रयत्न करतो. डोंगर दऱ्यातील अनाहत शांतता खर तर अनूभवावीच लागते पण गूलजार सारखा प्रतिभावंत कवी त्याच्या दिल ढूडंता है... या गाण्यात म्हणून जातो "इन बर्फीली सर्दियोमें किसी भी पहाड पर वादी में गुंजती हूई खामोशीया सुने" बेळगावच्या के,बी. कुलकर्णींसारखा प्रतिभावंत चित्रकार चित्रातील प्रकाश योजनेतू्नच भावनांचा अनोखा कँनव्हास कागदावर मांडून जातो.विलायतखांसाहेबांच्या सतारी वर वाजवलेले सांजगिरीचे स्वर आपल्याला वेगळ्याच जगात घेउन जातात. भरत नाट्यम मधील पदन्यास व भावमुद्रांमधून व्यक्त होणारे भाव कित्येक वेळा शब्दापलीकडले असतात.
हे सगळ पाहील्यावर ज्ञानदेवांच्या "शब्दे विण संवादू" चा अर्थ थोडासा का होईना कळतो

Monday, July 30, 2007

डिझायर टू डाय







रविवार दिनांक २९ जुलै. दुपारी ४-४॥ सुमारास मोबाईलची रिंग वाजली.नंबर परिचीत नव्ह्ता.गेले काही दिवस साधारणत: याच वेळी टेली मार्केटींगवाल्यांचे फोन येत होते त्या मुळे हा देखील तसलाच कुठ्ला तरी फोन असणार अशा समजूतीने जरा नाराजीनेच फोन उचलला.

"केसकर का? मी बँकेतून देव बोलतोय. एस.आर.गेले"

"आम्ही लगेचच त्यांना घेउन निघत आहोत.तुम्ही ताबड्तोब या"

काही क्षण मला काहीच सुचेना. एस.आर. माझा स्कूल मेट. १९६७ मधे मी पाचवीत व एस.आर.ने सहावीत सातारा सैनिक स्कूल मधे प्रवेश घेतला. तो १९७३ मधे तर मी १९७४ मधे पास आउट झालो. त्यानंतर अचानक १९९६ साली मी व्यवसायानिमित्त आमचे खाते ज्या बँकेत उघडले त्याच बँकेत तो नोकरीस होता.तिथे आमची पुन्हा ओळ्ख झाली. गेली अकरा वर्ष मात्र कामाच्या निमित्तने आमच्या नियमित गाठीभेटी होत होत्या. एस.आर.ने काही महिन्यापूर्वी बँकेतून स्वेच्छा निवॄती घेतली होती. डायबेटीस मुळे त्याला गेले वर्ष दीड वर्ष त्रास होत होता. डोळ्यात दोष आला होता. नीट दिसत नव्ह्त. किडनी खराब झाल्यामुळे आठवडयातून दोनवेळा डायालिसिस करावे लागत होते. गेल्या वर्ष भरात पैसा देखील पाण्यासारखा खर्च झाला होता.

अलीकडे त्याची भेट फारशी होत नसे.कधी तरी त्याच्या घरी गेलो तरच भेट व्हायची.हल्ली तो मानसिक दृष्ट्या खचला होता. बहुदा आपण लवकरच जाणार आहोत हे त्याला आतून कळालेल होत. पंध्ररा दिवसापूर्वीच आमची भेट बँकेतच झाली होती.पण तेव्हा हे सगळ एवढ्या लवकर घडेल अशी कल्पना नव्ह्ती.हे अस कधी तरी ऐकाव लागणार अस वाटतच होत. ऐकाव लागणार व ऐकणे यात शेवटी फरक असतोच ना! मी व वसुधा लगेचच निघालो. त्याच्या घ्ररी खूप गर्दी झाली होती. त्याच्या पार्थिवा शेजारी त्याचा मुलगा संकेत निशब्द बसुन होता. संकेतच वय जेमतेम २४ असेल. छोटी सायली आक्रोश करत होती.वसुधा वहिनींच सांत्वन करायला आत गेली.

या सगळ्यांना सोडून एस.आर. कायमचा निघून गेला. ज्या वेळी कुटूंबाला एका भक्कम आधाराची गरज होती नेमक्या त्याच वेळी आधार तूटला. मला एस.आर.ला ओरडून विचारावस वाटत होत "काय अधिकार होता रे तूला आत्ता जाण्याचा?"

एस.आर.ला डायबेटीस होता पण त्याने कधी काळजी घेतलीच नाही. खाण्यावर कधी नियंत्रण ठेवलेच नाही. सैनिक स्कूल मधे शिकून देखील व्यायामाचे मह्त्व कधी पटवून घेतलेच नाही.डोळे बिघडले,किडनी खराब झाली तरी पथ्य पाळली नाहीत. हे सगळ माहीत असल्यामुळे अस वाटत कि तो गेला ते एका अर्थी बर झाल. आत्ता त्याला कमी हाल सोसावे लागले. कालांतराने तो अगदीच गलीतगात्र झाला असता व मग स्वत:चे व कुटूंबाचे हाल झाले असते.

आमचे अण्णा नेहमी सांगत असतात माणसा मधे सह्सा जगण्याबद्दल आसक्ती असते तर काही जणात मरणा बद्दल आसक्ती आसते. पहिली डिझाय़र टू लिव्ह -पाँझिटीव्ह तर दुसरी डिझाय़र टू डाय-निगेटीव्ह.एस.आर. मधे बहूदा मरणाबद्दल आसक्ती जास्त असावी.

Desire to die was very strong!

ईश्वर त्याच्या आत्म्यास सद्ग्ती देवो!

Saturday, July 28, 2007

सईचा पर्पलमुन मराठीत?

ब्लाँग हा प्रकार नुसता ऎकून माहीती होता.ब्लाँग म्हणजे काय ते नेमकेपणाने मला कळाले ते सईचा ब्लाँग वाचून! सई म्हणजे माझी मुलगी. तीचा "परपल मुन" नावाचा ब्लाँग आहे. अप्रतिम लिखाण करते.
तिच्या नवीन पोस्ट ची मी आतूरतेने वाट बघत असतो. फक्त मीच नव्हे तर अनेकजण तिच्या पोस्ट कडे डोळे लावून बसलेले असतात.

तिचे पोस्ट मी जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा तेव्हा तिच्यातील ललीत लेखनाचे सामर्थ्य जाणवते.भाषेवरील पकड,नेमके शब्द वापरण्यासाठी आत्मसात केलेला अफाट शब्द संग्रह व सर्वात मह्त्वाचे म्हणजे तिची निरीक्षण शक्ती. चांगल लिहीण्यासाठी बारीक सारीक गोष्टीं तपशीलात जाऊन बघाव्या लागतात तेव्हाच त्या लिहीता येतात. तिच्या प्रत्येक पोस्ट मधे तिच्या निरीक्षण शक्तिचा प्रत्यय येतो.विषय गंभीर असो अथवा हलकाफुलका तो मांड्ला जातो मात्र प्रभावीपणे. तिच्या ब्लाँग वर काही वेळा कविता देखील असतात. त्या कविता तिच्यातील संवेदनक्षमतेच,तरलतेच व या दोन्हींच नेमक्या शब्दात प्रकटीकरणाच कौशल्यच दाखवितात.

तिच्या ब्लाँग बाबतीत एकच(म्हंटली तर) अड्चण आहे कि तो इंग्लीश मधे लिहीला आहे. ब्रर इंग्लीश देखील बाळ्बोध वळणाचे नाही. त्या मुळे हा ब्लाँग फक्त जाणकार इंग्रजी वाचकांना आंनंद देऊ शकतो.

माझी अशी इच्छा आहे कि जाणकार मराठी वाचकांना देखील याचा आस्वाद घेता यावा. बऱ्याच वेळा अस वाटायच कि नेटीझन्सना ह्या ब्लाँग मधील मजकूर मराठीत भाषांतरीत करुन द्यावा. (खर तर हे भाषांतर करणे कितपत जमेल हा एक प्रश्नच आहे म्हणा पण प्रयत्न करुन बघायचा! जमला तरच पोस्ट करायचा!).
इंटरनेट वर मराठीत लिहीण्यासाठी साँफ्टवेअर शोधण्यात खूप दिवस गेले व अचानक बराहा.काँम या साईट वरुन फ्रि डाऊनलोड करता आल.
साँफ्ट्वेअरचे काम झाले. आता पुढचेच काम कठीण आहे. भाषांतर करण्यासाठी आधी सई ची परवानगी काढ्ली पाहीजे.
सई देशील ना परवानगी ?

Monday, February 05, 2007

I was introduced to blogs through my daughter's blog. She posts her blogs regularly on her Purple Moon blog.

She is a creative writer which I had known but I realised it with great intensity when I started reading her blogs. Her writing has made me totally addicted to her blog post and now I await impenitently for her new posts.

Blogging has provided a new interface to share what you feel with millions on the net. It provides you with your own space to express what you feel. This was not possible earlier. You had to search a publisher or be content with sharing your thoughts with limited people. Writing (as well reading)is a good habit but due to the latest mobile communication ,emails,and SMS, I feel that these habits are changing. This new electronic interface however has revived the habits of writing and reading

The modern life is day by day becoming more competitive and also stressful. Writing blogs can unwind you from this stressful life. In a way it is a sort of catharsis which I feel is essential.

Let this movement of blogging flourish and bring relief to the stressful life.